कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी
जावली तालुक्यामध्ये मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीनंतर बोंडारवाडी व आसपासच्या गावांना वाहतुकीचा प्रचंड मोठा सामना करावा लागत होता. त्यामुळे खाजगी वाहतुकीचा मार्ग धरावा लागत होता.सर्व सामान्य नागरिकांना न परवडण्यासारखाच शालेय विद्यार्थ्यांना तर दररोज आठ किलोमीटर चालत ये- जा पायपिट करावी लागत होती.
शालेय विद्यार्थी,अबालवृद्ध नागरिकांची होणारी परवड लक्षात घेऊन या मार्गावर एस.टी वाहतुक सुरु व्हावी यासाठी माजी आमदार सदाशिव सपकाळ, विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथदादा ओंबळे,क्षेञप्रमुख एस,एस पार्टे गुरुजी,तालुकाप्रमुख विश्वनाथजी धनावडे,केळघर शहरप्रमुख बाळासाहेब शिर्के,नंदु चिकणे यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा व प्रयत्न केले असल्यामुळे
आजपासुन बोंडारवाडी ते मेढा मार्गावर लालपरी धावु लागली आहे.
नागरिकांची व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या एस.टी मुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
बाहुळे या गावी शिवसेना पदाधिकारी व बाहुळे ग्रामस्थांच्या वतीने एस.टीचे पुजन करुन वाहक व चालक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रामुख्याने संपर्कप्रमुख एकनाथदादा ओंबळे, तालुकाप्रमुख विश्वनाथजी धनावडे, केळघर शहरप्रमुख बाळासाहेब शिर्के, माजी विभागप्रमुख नंदु चिकणे, वैद्यकिय कक्ष समन्वयक प्रशांत जुनघरे,युवासेना उपतालुकाप्रमुख दिपक पवार, शाखा प्रमुख राजाराम जाधव, जगन्नाथ जाधव, व आदि ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ