IHRA News

IHRA Live News

कटू अाहे,पण सत्य अाहे!

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी
येत्या दहा-पंधरा वर्षांमध्ये एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे.कटू असलं तरी हे सत्य आहे कारण हे जग कोणी थांबवू शकत नाही.या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत ! सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे,पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे,फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणार्याची आस्थेने चौकशी करणारे,दोन्ही हात छातीशी नेेऊन नमस्कार करणारे, अन्न-धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि तरीही उरलं तर गरिबाला देणारे किंवा दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे ! पाहुणेरावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे,आपले सण धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे,व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे,जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटून,जुनी चप्पल फाटली तर शिवून अाणि जुना बनियान गलितमात्र होईपर्यंत वापरणारे,उन्हाळ्यात पापड वाळवणारे,हात दुखेपर्यंत कुटूून मसाला घरी बनवणारे,फक्त बाहेर घालायच्या कपड्यांना इस्त्री करणारे,खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरीच जेवणारे !

असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालली आहेत. ती जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचे बरोबरच जाईल, समाधानी,साधे,अर्थपूर्ण,दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण ह्या जगातून कायमचीच नाहीशी होईल !! त्यानंतर राहील फक्त स्वार्थ,अविश्वास असंवेदनशील मन,चौन,वखवख,भकास कोडगेपणा आणि मोबाइलवरचे कृत्रिम अगत्य अन् सारं आभासी तथाकथित जीवन !

0Shares
error: Content is protected !!